Saturday, 3 September 2016

समर्पयामि संस्कृताय जीवनम् ।

तावदेषा देवभाषा, देवी स्थास्यति भूतले ।
यावच्च वंशोsस्त्यार्याणां तावदेषा ध्रुवंध्रुवा ।।

    संस्कृतच्या बाबतीत एक सुभाषितकार वरीलप्रमाणे गौरवोद्गार काढतो की या पृथ्वीतलावर जोपर्यंत नद्या, पर्वत इ. आहेत तोपर्यंत ही देवभाषा प्रचलित राहील. खरोखरच ही देववाणी, गीर्वाणवाणी संस्कृत भाषा अत्यंत मधुर आणि मंजूळ आहे. सध्याच्या काळात मात्र नित्य उपयोगात ती आणली जात नाही. कर्नाटकातील मत्तुर या गावी मात्र ती आपल्याला जिवंत दिसते. हे एक खेडेगांव आहे. मात्र याठिकाणी असणाऱ्या सर्व मंडळींची रोजची व्यवहार भाषा संस्कृत आहे. खरं तर अनेक भाषांची जननी ही संस्कृत आहे. लॅटीन, जर्मनी, रशियन, रोमन या परकीय तर हिंदी, काश्मिरी कानडी, उर्दू, मराठी इ.अनेक भारतीय भाषांमधील शब्दांची व्युत्पत्ती आपल्याला संस्कृत भाषेत दिसते. या भाषेच्या साहित्याला 5000 वर्षांचा अत्यंत प्रगल्भ इतिहास आहे. पण काळाच्या ओघात ती जपजाप्य -स्तोत्रे इ.पुरती मर्यादित आहे असा घातक विचार पसरत गेल्याने ती मागे पडत गेली. खरं तर संस्कृत भाषेएवढी नूतनता, रसिकता, वैज्ञानिक दृष्टी, कलात्मकता कोणत्याच भाषेत नाही. फक्त बऱ्याच ठिकाणची उदाहरणे ही गोष्टीरुपात साहित्यात पेरली गेल्याने आपला त्यावर विश्वास बसत नाही. राक्षस-देव यांच्या युद्धात- डोळे शस्त्रक्रिया करुन बसविले, रामायणात- पुष्पक विमान वापरले, महाभारतातील मयसभेची रचना, कणाद ऋषिंचा पिलवः पिलवः करत प्राण सोडल्याचा दाखला, कोsरुक कोsरुक (निरोगी कोण आहे) असे म्हणत फिरणारा पक्षी -          ( आयुर्वेदाचा मोठा मंत्र सांगून जातो - हितभूक, मितभूक, ऋतभूक ...
    वरील सर्व उदाहरणांचा जर आपण अभ्यास केला तर लक्षात येईल की "काखेत कळसा आणि गावाला वळसा" अशी आपली स्थिती झाली आहे. आपला जो 'प्रगल्भ वारसा' rich heritage तो आपण विसरत चाललो आहे. 1991 आणि 2001 साली झालेल्या जनगणनेनुसार अनुक्रमे 49736 आणि 14135 लोकच संस्कृत ही आपली मातृभाषा म्हणून वापरतात.
    मग जर ही भाषा आपल्याला मृत होण्यापासून वाचवायची असेल तर सर्व स्तरावर प्रयत्न होणे गरजेचे आहे. परकीय विद्यार्थी, विद्यापीठे येऊन आपलाच कच्चा माल नेऊन पक्का करुन आपल्याला नवीन आवरणात-आकर्षकरित्या सादर करतात आणि आपण ते पहात बसतो हे कितपत योग्य आहे ?
    खरं तर संस्कृत भाषा ही राष्ट्रभाषा व्हावी अशी राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची खूप इच्छा होती. डॉ.आंबेडकर हे संस्कृत विषयाचे अत्यंत चांगले जाणकार होते. संस्कृत भाषा आपली आहे व ती रहावी यासाठी त्यांनी संसदेत संस्कृतमधूनच विचार मांडले होते पण काही कारणास्तव हा विचार मागे पडला.
    सध्याच्या परिस्थितीत पाहिले तर संस्कृतभाषा ही शाळाशाळांमधून शिकविली जाते. भारतातील कार्यरत असणाऱ्या प्रत्येक विभागीय मंडळांची याबाबतीतली भाषा रचना मात्र भिन्न आहे. काही विभागांनी तिला व्दितीय भाषा म्हणून स्वीकारली आहे. काही विभागांनी तृतीय भाषा म्हणून तिचा स्वीकार केला आहे. काही ठिकाणी ही भाषा 6 वी पासून शिकविली जाते तर काही ठिकाणी ती 8 वी पासून परिचित होते. महाविद्यालयीन व उच्च शिक्षणाच्या बाबतीत विचार केला तर भारतात संस्कृतसाठी अनेक विद्यापीठे कार्यरत आहेत. पण या विद्यापीठांना चांगले विद्यार्थी कमी पडत आहेत. यासाठी माध्यमिक स्तरावर अनेक बदल घडणे आवश्यक आहे. माध्यमिक स्तरावर विद्यार्थी फक्त गुण मिळवून देणारी भाषा एवढाच मर्यादित विचार तिच्या बाबतीत करतात.
    सन 2014-15 पासून संस्कृत विषयाच्या बाबतीत एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला की संस्कृत विषयाची प्रश्नपत्रिका नको तर तिची कृतिपत्रिका असावी. 14-15 पासून आठवी-नववी तर यावर्षी इयत्ता 10वी साठी हा बदल सर्वत्र ग्राह्य धरला आहे. हा बदल अत्यंत सकारात्मक आहे. ज्याप्रमाणे इंग्रजीची प्रश्नपत्रिका इंग्रजीमध्ये , हिंदीची हिंदी मध्ये आहे त्याप्रमाणे संस्कृतची संस्कृतमध्ये. यामुळे विद्यार्थी व शिक्षक संस्कृत भाषा परत एकदा संवादात, रोजच्या वापरात आणतील, छोटी छोटी वाक्ये बनवतील अशी अपेक्षा आहे. याठिकाणी एक मोठी दरी अशी निर्माण झाली आहे की आत्ता जे शिक्षक या विद्यार्थ्यांना शिकवत आहेत ते जेंव्हा शिकले त्यावेळी आठवीपासून उच्चशिक्षणापर्यन्त संपूर्णपणे भाषांतर पद्धतीनेच शिकविले जात होते. त्यांच्यासाठी हा communicative approach अत्यंत नविन आहे. राष्ट्रीय संस्कृत संस्थान नवी दिल्ली, संस्कृत भारती अशा काही संस्थांचे यासाठी पत्रद्वारा, प्रशिक्षणे, संभाषण वर्ग उपलब्ध आहेत. याचा नक्कीच उपयोग शिक्षकांना होईल. जर आपण अजूनही दूरदृष्टीने विचार केला तर अशा प्रकारे संस्कृत शिक्षित होणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक क्षितिजे खुली होतील.
    जगाला मार्गदर्शक असणारी आयुर्वेद ही पद्धती भारताकडेच आहे. सध्या आयुर्वेदातील उपचार पद्धतीवर संशोधन सुरु आहे. गणितातील अनेक क्लिष्ट संकल्पनांचा विचार भास्कराचार्यांनी लिलावती ग्रन्थात केलेला आहे. त्याचे पुनरोज्जीवन करणे आपल्याच आतात आहे. धातूमिश्रणशास्त्रा विषयी संस्कृतमध्ये अनेक ग्रन्थ उपलब्ध आहेत. दिल्ली येथील स्तूप हजारो वर्षे झाले तरी अजूनही ऊन, पाऊस, थंडी झेलत आहे. ज्योतिषशास्त्र हे अत्यंत शास्त्रीय बैठक असणारे श्सात्र आहे. तारांगणातील अनेक ग्रहांचा प्रभाव ऋतुमान, मानवी जीवन, पशुपक्षी, प्राणी यांवर कसा पडतो याचे विवेचन आहे. उत्तम पुरुष लक्षणे, वास्तु बांधणीसाठी चांगली जमीन कशी निवडावी, उत्तम अश्व कसा निवडावा, विमान बांधणी, जहाज बांधणी, कृषिकर्म, नाट्य, साहित्य, संगीत एक ना अनेक विषय संस्कृतात आहेत. आर्यचाणक्यांचा अर्थशास्त्र ग्रंथ तर आजही प्रत्येक अर्थतज्ञांनी संदर्भग्रन्थ म्हणून वापरावा. संस्कृत ही भाषा व्याकरण दृष्ट्या जर्मन भाषेशी साधर्म्य असणारी आहे त्यामुळे जर्मन भाषा संस्कृत येणाऱ्यांना  लवकर समजते.
    या सर्व प्राचीन ग्रन्थ संपदेतून संशोधन करण्यास खूप वाव आहे. आपले विद्यार्थी फक्त काहीच क्षेत्रांकडे ( इंजिनिअर व मेडिकल अँलीओपॅथी) आपली शक्ती लावत आहेत.
    कित्येक वर्ष हळद ही घराघरात वापरली जायची. तिच्यातील अनेक गुण आपल्याला माहिती होते. पण अमेरिकेने त्यावर जेंव्हा मालकी हक्क सांगितला त्यावेळी आम्हाला जाग आली. मा.डॉ.माशेलकर यांनी यासाठी खुप मोठा लढा देऊन याची मालकी भारताकडे ठेवली. पण अशा अनेक गोष्टी आमच्याच आहेत पण त्या आम्हाला माहित नाहीत अशी आमची अवस्था आहे.
    या क्षेत्रांची माहिती करुन घेऊन शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांच्यात (माध्यमिक गटातच) संस्कृतची आवड व जागृती निर्माण केली पाहिजे नाहीतर हा आपला ठेवा नष्ट होईल व हळहळ करण्याव्यतिकीक्त आपण काहीच करु शकणार नाही. आज माध्यमिक स्तरावर अशा अनेक शाळा माझ्या पाहण्यात आहेत की त्याठिकाणी असणारा संस्कृत विषय -संस्कृत शिक्षक नसल्याने बंद पडला आहे. खरं तर प्रत्येक भारतीयाला जशी हिंदी-राष्ट्रभाषा, मातृभाषा येते तशी संस्कृत आलीच पाहिजे. त्यासाठी आत्ताच्या संस्कृत जाणकारांची खालील भूमिकाच असली पाहिजे.
    समर्पयामि संस्कृताय जीवनम् ।




                                          माधुरी अभय कुलकर्णी 

स्मार्ट खेड्यांकडे चला

प्रस्तावना

       सध्या स्मार्ट हा शब्द अगदी सतत कानावर पडतोय. रोजच्या वर्तमानपत्रात एकतरी बातमी या स्मार्ट वर असतेच. त्यातही स्मार्ट सिटी योजना हा तर आपल्या औत्सुक्याचा विषय झालाय. मग विद्यार्थ्यांसाठी स्मार्ट म्हणजे आपण थोक्यात काय सांगू शकतो तर -
       सर्व काही जिथल्या तिथे व्यवस्थित आणि नीटनेटकेपणाने असणे म्हणजे 'स्मार्ट' ही कल्पना. मग स्मार्ट सिटी किंवा शहरांना स्मार्ट करायचे म्हणजे काय ? तर शहरातील प्रशासकीय सेवांसाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर झाला पाहिजे. नागरी सुविधा वाढल्या पाहिजेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कार्यक्षम व स्वस्त,दर्जेदार शिक्षण विविध क्षेत्रांतील उद्योग आकर्षित त्याठिकाणी होवून रोजगार निर्माण झाला पाहिजे. अशा शहरांना आपण स्मार्ट म्हणणार आहोत मग अशी शहरे सध्या अस्तित्वात नाहीत पण नियोजनबद्धपणे त्यांचे रुपांतर अशा स्मार्ट शहरांमध्ये करता येणार आहे अशी 100 शहरे शासनाने या आराखड्यात गृहीत धरली हेत. अशा स्मार्ट शहरांमध्ये सर्वांगीण विकासाकरीता अद्ययावत माहिती तंत्रज्ञानाच्या साधनांचा उपयोग केल्यामुळे शहरी-गरीब आणि वंचित घटकांना अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
       हा सर्व झाला भविष्यकाळ. पण वर्तमान काळात काय परिस्थिती आहे हे होऊ घातलेल्या नागरिकांसमोर म्हणजेच आताच्या विद्यार्थ्यांसमोर आणण्यासाठी आम्ही शालेय सत्रावर एक सर्वेक्षण केले.

उद्दिष्टे

1.     विविध क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणांची माहिती गोळा करणे.
2.     त्यांचे शिक्षण, कामाचे ठिकाण, स्वरुप, वेळ, अडचणी, फायदे, यांची माहिती घेणे.
3.     स्वतःच्या गावात नोकरी न करण्याची कारणे जाणून घेणे.
4.     कमाल तरुणांची संख्या बाहेरगावी / परदेशी असल्याने कुटुंब व्यवस्थेवरील त्याचा परिणाम जाणून घेणे.
5.     आरोग्यावर झालेला परिणाम.
6.     मोठ्या शहरांवर व खेड्यांवर लोकसंख्येच्या स्थलांतराने झालेल्या परिणामांचा अभ्यास करणे.
7.     सर्व समस्या विद्यार्थिनींना माहिती करुन देणे व आपले करिअर निवडताना योग्य दिशा मिळवण्यासविचार प्रवृत्त करणे.
8.     कल चाचणीचे गांभीर्य लक्षात आणून देणे.

कार्यवाही
       दिवाळीपूर्वी विद्यार्थिनींना आपण करत असलेल्या प्रकल्पाची माहिती दिली. त्याचप्रमाणे त्याचे महत्व पटवून दिले. विद्यार्थिनींच्या मदतीने प्रश्नावली तयार केली. सुट्टीला जाण्याच्या आदल्या दिवशी विद्यार्थिनींना प्रश्नावली छापील स्वरुपात दिली. त्याचप्रमाणे माहिती गोळा करताना प्रश्नावली सोबतच मुलाखतीचे मुद्दे ही त्यांना स्पष्ट केले. मुलाखत ही अकृत्रिम कशी होईल याकडे कटाक्षाने लक्ष देण्यास सांगितले.
*      एकूण 200 घरांचे सर्वेक्षण करण्यात आले.
*      सुट्टी संपल्यावर प्रश्नावलीवरुन माहिती संकलन केले व माहितीचे विश्लेषण केले.    

       स्व.शे.रामविलास किसनलाल लाहोटी कन्या प्रशालेतील 9अ च्या विद्यार्थिनींकडून व्यक्तीमत्व विकास अंतर्गत उपक्रम करुन घेतला आहे त्याचा हा आढावा. दिवाळीपूर्वी 67 विद्यार्थिनींनी कराड व कराड तालुक्यातील 200 घरांचे सर्वेक्षण केले. यासाठी प्रश्नावलीचा व मुलाखत तंत्राचा वापर केला. या सर्वेक्षणामध्ये विविध क्षेत्रात काम करणाऱ्या 22 ते 45 या वयोगटातील कुटुंबांची व कुटुंब प्रमुखांची माहिती गोळा केली.
       सर्वेक्षणातून मिळालेल्या माहितीनुसार नोकरी निमीत्त 200 कुटुंबापैकी
       बाहेरगावी नोकरी करणाऱ्यांची नोकरीची ठिकाणे खालीलप्रमाणे आहेत.

ठिकाण
टक्केवारी
पूणे
42
मुंबई
13
परदेश
4
दिल्ली
1
कोकण,सातारा,सांगली व इतर शहरे
40

       कराड व कराड परिसरातून पूणे शहरात सर्वात जास्त स्थलांतर झालेले दिसून येते.
       सर्व लोकांच्या शिक्षणाचा आढावा घेतला तर
      
कार्यक्षेत्र
टक्केवारी
इंजिनिअरींग,कॉम्पूटर,आय.टी.इ.
58
वैद्यकीय
7
शासकीय
14.5
आर्मी व पोलीस दल
3.5
कलाक्षेत्र
1
फॉरेन लँग्वेजेस
0.5
इतर
15.5

       सर्वात जास्त कार्यक्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्ती या इंजिनिअरींग क्षेत्रात आहेत.

       बाहेरगावी नोकरी स्वीकारण्याची कारणे-
      
कारणे
टक्केवारी
गावाकडे शिक्षणाला योग्य संधी नाही
68.5
पगार कमी
13.5
इतर
17



       स्थालांतरित झालेल्य़ा कुटुंबामध्ये कौटूंबिक जबाबदारी कोण स्वीकारते ?
           
कौटुंबिक जबाबदारी
टक्केवारी
आजी-आजोबा घर सांभाळतात
17
कामाला बाई
7
पाळणाघर
12
इतर
2
बायको नोकरी करत नाही
62
      
       सर्व घरातील तरुणी या चांगल्या प्रकारे शिक्षीत असून कौटूंबिक जबाबदारीमुळे कोणत्याही 
       कार्यक्षेत्रात काम करीत नाहीत.
       राहत्या घरापासून नोकरीच्या ठिकाणी प्रवासाचा कालावधी अधिक कामाचे तास
      
कामाचे + प्रवासाचे तास
टक्केवारी
10
53.5
8
44.5
6
2

       नोकरीच्या ठिकाणी जाणेयेणेसाठी वापरली जाणारी वाहन व्यवस्था

      
वाहने
टक्केवारी
दुचाकी
35.5
चारचाकी
17.5
ऑफिसची गाडी
16.5
सार्वजनिक वाहन
30.5

       गावात नोकरी उपलब्ध झाल्यास स्वीकाराल का ? हो म्हणणाऱ्यांची संख्या 94 आहे. बाकीचे 
       गावाकडे येण्यास तयार नाहीत.
       गावात नोकरी स्वीकारण्याचे कोणते फायदे आहेत ?
       फायदे
टक्केवारी
कुटुंबाबरोबर राहता येईल
60
शेती करता येईल
8.5
खर्चाची बचत होईल
25
इतर
6.5
      


        नोकरीच्या गावातील अडचणी व समस्या
      
       अडचणी
टक्केवारी
वाहतुकीची समस्या
39
धावपळ,निकृष्ठ जेवण इ.समस्या
19
महागाई
12.5
घराकडे दुर्लक्ष
17.5
इतर
12

       गावाकडे कोणत्या स्वरुपाचे व्यवसाय उद्योगधंदे, कंपन्या सुरु व्हाव्यात.
      
       स्वरुप
संख्या
आय.टी.कंपन्या,कॉम्प्यूटरशी संबंधित
भरपुर पगार असणाऱ्या कंपन्या
72.5

मुंबई, पुणे महानगरांसारख्या कंपन्या
19.5
कौशल्यावर आधारीत व्यवसाय सुरु व्हावेत
8

       वृद्धांच्या अपेक्षांना योग्य न्याय देवू शकत नाही असे म्हणणारे 61 टक्के लोक आहेत.

       नोकरी करुन आल्यावर पत्नी, मुले यांच्यासाठी योग्य वेळ देवू शकत नाही असे म्हणणारी 57.5 टक्के लोक आहेत. तर या दगदगीच्या जीवनामुळे 44 टक्के लोकांना आरोग्याच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत.
       चिंतन -
       आपणांस वरील माहितीवरुन लक्षात येते की, कराड व कराड परीसरातून सर्वात जास्त स्थलांतर पूणे शहरात झाले आहे. शिक्षणाला योग्य सेंधी नाहीम्हणून अनेक कुटुंबे स्थलांतर करत आहेत. अर्थातच आजूबाजूची खेडेगावे ओसच पडत आहेत त्यामुळे स्थावर मालमत्तेचे नुकसान होत आहे. एकीकडे ही परिस्थिती आहे तर मोठ्या शहरांमध्ये लोकसंख्येचा अतिरिक्त बोजा पडत आहे. या सर्वाचा परिणाम तेथील नागरी सुविंधावर होत आहे. पूणे मुंबई सारख्या शहरांमध्ये पाण्याचा, जागेचा तुटवडा भासू लागल्याने आजूबाजूच्या उपनगरातून शेतजमिन बांधकामासाठी वापरली जात आहे त्यामुळे अन्नधान्य उत्पादन करण्यास शेतजमिन कमी पडत आहे. गावाकडे तरुण मंडळींची कमतरता निर्माण झाल्याने शेती व वृद्ध माणसांच्या देखभालीचा प्रश्न गांभीर्याने निर्माण होत आहे. शहरांमध्ये आई-वडिल दोघेही नोकरीसाठी बाहेर असल्याने घरातील छोट्या मुलांचा प्रश्न गंभीर रुप धारम करत आहे. भारताची पारंपारीक एकत्र कुटुंब पद्धती मोडकळीस येत आहे. संस्कार, प्रेम, भावना जपणूक, घरचा पौष्टीक हार या गोष्टी दुरावत चालल्या आहेत.
         56.9 टक्के स्त्रीया मुलांच्या संगोपनासाठी नोकरी अथवा करीअर करु शकत नाहीत. मग या स्त्रीयांच्या शिक्षणासाठी वैयक्तिक व शासकीय केलेली गुंतवणूक वाया जात आहे. याचा गांभिर्याने विचार होणे गरजेचे आहे. राहत्या घरापासून कामाचे ठिकाण लांब आहे शिवाय नोकरीचे तास कमीतकमी 10 तास असल्याने कुटुंबाला व्यायामाला व स्वतःच्या छंद जोपासण्याला वेळच मिळू शकत नाही. नोकरीच्या ठिकाणी येण्याजाण्यासाठी वैयक्तिक दुचाकी व चारचाकी वाहनांचा वापर करण्याकडे जास्त कल आहे. त्यामुळे वाहतूक जाम व प्रदुषणाचा मोठा प्रश्न निर्माण झाल्याचे दिसत हे. या सर्वाचा परिणाम 22 ते 45 या वयोगटातील लोकांच्या आरोग्यावर होताना दिसत आहे. तरीदेखील योग्य उत्पन्नाचे साधन नसल्यामुळे 53 टक्के लोक गावाकडे येण्यास तयार नाहीत.
       सर्वात महत्वाचा सर्वेक्षणातील मुद्दा असा दिसतो की शेती करण्याची इच्छा व शेतजमिन उपलब्ध असणाऱ्यांची संख्या ही अगदीच नगण्य आहे. टक्केवारी नुसार 8.5 टक्के लोकच उत्पादन करु शकतात आणि खाणाऱ्यांची संख्या मात्र 92.5 टक्के आहे. यावरुन अन्नधान्य टंचाई निर्माण होईल यात वादच नाही.
       वरील सर्व गोष्टींचा परामर्श घेतल्यास असे वाटते की, स्मार्ट शहरे निर्माण करण्याकडे जेवढे लक्ष दिले जात आहे तेवढेच स्मार्ट खेड्यांकडे अथवा ठराविक विकसनशील कराड, सातारा, सांगली सारख्या शहरांकडे देण्यात यावे. ( आम्हाला माहित असलेले व सर्वेक्षण करण्यास सोईचे म्हणून कराड शहर निवडले अशी प्रातिनिधीक अनेक गावे भारताच्या कानाकोपऱ्यात आहेत व त्याठीकाणीही हीच अवस्था थोड्याफार फरकाने निदर्शनास येईल यात शंका नाही.) सर्व व्यवसाय, कंपन्या,शिक्षण क्षेत्रे यांचे काहीच गावांमध्ये केंद्रीकरण झालेले दिसते. त्यांचे विकेंद्रीकरण होणे महत्वाचे आहे. तरच पूणे-मुंबई कडे जाणारा लोकसंख्येचा भार कमी होईल. शिवाय प्रगत महाराष्ट्र योजनेअंतर्गत कौशल्यावर आधारित उद्योगधंदे, व्यवसाय सुरु झाल्यास शेतीला पूरक अर्थप्राप्ती होईल.
       सर्वेक्षणातून सर्वात जास्त लोक इंजिनिअरींग क्षेत्रात काम करत आहेत. या अनुषंगाने अनेक महाविद्यालये या 10 वर्षात ठिकठिकाणी उभी केली गेली. परंतू आता मात्र इतक्या रोजगार संधी उपलब्ध नसल्याने इंजिनिअरींग कडे जाणाऱ्यांची संख्या घटत आहे व पदवीधारक व पदवी देणारी महाविद्यालये बंद पडत आहेत.
       गावाकडची लोकसंख्या गावाकडेच राहील्याने वेळ व इंधन बचत होईल. त्याचप्रमाणे आपल्याकडे वैयक्तिक वाहन व्यवस्थेवर जास्त भर दिला जातो. यासाठी उद्बोधन करण्याची गरज आहे. एका माणसासाठी चारचाकी वापरणे हा प्रेस्टीज इशू केला जातो. परंतू तसे न होता सार्वजनिक वाहतुकीचा वापर केला गेला पाहिजे किंवा कार पुलींगचा वापर होणे गरजेचे आहे. प्रगत महाराष्ट्र योजने अंतर्गत रस्ते, बंदर विकासासाठी 73 हजार कोटी रुपयांची योजना आखली जात आहे. यातूनच जर जलद गतीने आणि सर्वदूर अशी वाहतूक व्यवस्था लोकांसाठी उपलब्ध करुन दिली तर वरील सर्व प्रश्न मिटतील. छोटी छोटी गावे सुद्धा हवाई वाहतूक, मेट्रो सेवांनी जोडली व स्ट्रॉंग नेटवर्कींग खेड्यांपर्यंत आणले तर मल्टीनॅशनल कंपन्यांना विकसनशील गावात कंपन्या उभ्या करता येतील व गावाकडील मनुष्यबळ गावातच स्थिरावेल.
       महात्मा गांधीजींनी सांगीतलेली मूलोद्योग, व स्वयंपूर्ण खेड्यांची रचना पुन्हा एकदा साकारली जाईल.
       यातून अजूनही एक महत्वाचा मुद्दा दिसतो तो 17.2 टक्के कुटुंबातच आजी-आजोबा रहात आहेत. नातवंडांचा सांभाळ करत आहेत. मग अमेरिकेसारखी कौटुंबिक परिस्थिती आपल्याकडे निर्माण होण्याची शक्यता बळावत आहे. अमेरिकेतील अनेक वृद्ध जोडप्यांकडे पुष्कळ पैसा हे पण भावना वाटून घेण्यासाठी, देखभाल करण्यासाठी विश्वासातली रक्ताची माणसे उपलब्ध नाहीत.
  
       हे सर्व सर्वेक्षण 9 वी च्या विद्यार्थिंनीकडून करुन घेण्यामागची भूमिका काय होती ? शासनाकडून सध्या शैक्षणिक क्षेत्रात एक नवी योजना राबविली जाणार आहे ती वरील सर्व गोष्टींना उपचारात्मक ठरेल. इयत्ता 9 वी तून 10 वीत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची कल चाचणी घेऊन त्यांची ज्या विषयांमध्ये गती आहे त्या विषयात त्यांना शिकण्याची मूभा दिली जाणार आहे. मग यातूनच स्वतःच्या अंगी असणाऱ्या गुणांची, कौशल्यांची माहिती विद्यार्थिंनींना होणार आहे. म्हणूनच सत्य परिस्थिती व समस्या योग्य वयात विद्यार्थिंनीच्या समोर मांडल्या तर योग्य करीअर निवडण्यासाठी त्या प्रवृत्त होतील हे नक्कीच व त्यामुळेच 2020 साली अब्दूल कलामांच्या स्वप्नातील तरुण पिढीचा योग्य मार्गक्रमण करणारा भारत देश निर्माण होईल.( या सर्वेक्षणासाठी प्रशालेच्या मुख्याध्यापिका,सर्व अधिकारी व माझ्या लाडक्या 9 वी अ च्या विद्यार्थिनींचे व पालकांचे अनमोल सहकार्य लाभले)  


                                       माधुरी अभय कुलकर्णी 

Friday, 2 September 2016

प्रेरणादायी स्मरण…. मा. मधुकर पेठे

मला लिखाणाची फार उर्मी. आमच्या शिक्षण मंडळाची प्रतिवर्षी दोन सत्रातप्रबोधन पत्रिकाप्रकाशित होते. त्यात दर्जेदार,निवडक शैक्षणिक लेख असतात. त्यामध्ये मी खूप वेळा लिखाण केले, ते छापले गेले,पण अजुन नवीन कुठेतरी आपण लिखाण केले पाहिजे  असं वाटत होते. आमच्या शाळेत गेले २० वर्षे महाराष्ट्र भारतीय शिक्षण हे मासिक येते , मी त्याची नियमीत वाचक आहेसहज १३-१४ चे मासिकातील  ‘राज्यस्तरीय शैक्षणिक स्पर्धाहे परिपत्रक वाचले. त्यात कै...उपाख्य नाना भावे स्मृती स्पर्धा निवेदन दिसले,विषय आवडीचा होतो उपक्रम लिहून पाठवा (फलश्रुती महत्वाची).  हे वाक्यच मला फार आवडले. मी उपकृम केलेले होते पण लिहून  पाठवले नव्हते पण नुकतीच तारीख संपली होती तरीपण केलेला उपकृम सांगण्याची खुमखुमी फार होती. मी मासिकावरील मोबाईल क्रमांकावर फोन करायचा ठरवला,पाहू तरी विनंती करून असे वाटले त्यातला ओळखीचा क्रमांक होता तो म्हणजे मा.पेठे सरांचा. आता ओळखीचा असे मी मुद्दाम म्हणतेय म्हणजे सरांची आणि माझी ओळख मासिकातीलच.. कारणगुरुवाणीहे सदर वाचण्यासाठी मी अत्यंत आतुर असायचे. आमच्या प्रशालेच्या पर्यवेक्षिका (माझ्या शिक्षिका) सतत मला सांगायच्या मा. मधुकर पेठे सरांचे विचार वाचत जा आणि मग मला ती सवयच लागली.मी या अप्रत्यक्ष ओळखीच्या जोरावर सरांना फोन केला. मी मानसिकता केली होती की आता उत्तर मिळणार तारीख संपलीय, तुम्ही पुढील वर्षी लवकर मासिक पहा,पण असं काहीच झालं नाही उलट सरांनी विचारले,’लेख लिहिला आहे का? मी म्हटले कच्चा तयार आहे.मग व्यवस्थित पूर्ण करून् ताबडतोब पाठवा. तसा फोन आमच्या कार्यालयात करा. पण कार्यालयात माझा फोन लागू शकला नाही. मला सरांना परत फोन करणं योग्य वाटतं नव्हतं पण मझ्याकडं दुसरा पर्यायही नव्हता.. मी सरांना फोन केला आणि परत फोन का केला म्हणून ते मझ्यावर चिडले नाहीत उलट मी बाहेरगावी आहे पण तुमचा विषय कोणता आहे, हे त्यानी विचारले विषय संस्कृत म्हटल्यावर सरांना बरे वाटले. तुम्ही लिहा मी कार्यालयात सांगेन अशी त्यांनी जबाबदारी घेतली.


खरचं सरांच्या त्या बोलण्यानं माझं नातं या मासिकाशी पक्कं झालं. माणसं सरांनी कशी तयार केली, आणि जोडली असतील याचा अंदाज आला. अप्रत्यक्ष सरांच्या विचारांची मी अनुयायी बनले.अध्यापकांनी लिहतं व्हावं-लिहीत असताना अनेक् संदर्भ वाचले जातात आपोआपच् अध्यापनात हे विचार रूजवले जातात ,अध्यापक प्रयोगशील बनतात, घडतात,पर्यायाने ते चांगले विद्यार्थी घडवतील. चांगले अध्यापकच चांगला देश घडवतील. हाच सरांचा या सर्व खटाटोपाचा उद्देश असणार.सरांचा हा अप्रत्यक्श् प्रेरणादायी सहवास मला खुप काही शिकवून गेला. गतवर्षीच्या पारितोषिक वितरणास आम्ही सरांना भेटण्याच्या ओढीने कराडहून आलो पण त्याच वेळी सरगेल्याची दुःखद घटना समजली फार वाईट वाटले. पण सराचे विचार पुढे नेणे ही त्यांच्यासाठी आदरांजली ठरेल. आणि सरांच्या विचारांतून साकारलेल्या या मासिकाच्या देखिल संपर्कात नक्कीच राहू. धन्यवाद

माधुरी अभय कुलकर्णी

सांस्कृतिक कार्यक्रमातुन व्यक्तिमत्व विकास

      नृत्य-नाट्य-संगीत हा मनुष्याच्या जीवनाचा अनन्यसाधारण भाग आहे. मानवाच्या जीवनातून कला जर दूर केली तर ते निरस होऊन जाईल. जीवनात रोजच्या धकाधकीतून बाहेर पडायचे असेल तर या अभिजात कलाच मनुष्याला तारक ठरतात. म्हणुनच एक सुभाषितकार म्हणतो.
                  काव्यशास्रविनोदेन कालो गच्छति धिमताम्।
                  व्यसनेन मूर्खाणां निद्रया कलहेन वा
      बुध्दिमान माणसाचा वेळ हा काव्य-विज्ञान-करमणुक यांच्या आनंदग्रहणात जातो. तर मूर्खांचा वेळ हा वाईट गोष्टींची संगत,झोप,नाहीतर भांडणात जातो.म्हणजेच आपल्या जीवनात कलेचे महत्वाचे स्थान आहे. या कलेची योग्य जाण आपण विद्यार्थ्यांच्यात लहानपणातच निर्माण केली पाहिजे.चांगलं बघणं, चांगलं वागणं, चांगलं लिहिणं, आणि मग चांगलं व्यक्त करणं आपण मुलांच्यात रुजवलं पाहिजे. असे लिहिण्यामागं अनेक विचारांचा संघर्ष मनामध्ये आहे. सध्या दूरदर्शनवर अनेक वाहिन्यांवर लहानमुलांच्या नृत्य-संगीत-नाट्य यावर आधारित कार्यक्रम-स्पर्धा सुरू आहेत. त्यामध्ये मुलांच्या वयानुरुप कोठेही गाण्याची निवड नसते. पोषाख चित्रविचित्र आपल्या संस्कृतीला धरून नसतात.त्या मुलांकडून करवून घेतलेले अंगविक्षेप बीभत्स / लाजिरवाणे असतात. आणि याचेच लहानस्वरूप म्हणजे शाळाशाळांमधून होणारे विविधगुणदर्शनचे कार्यक्रम. महाविद्यालयांमध्ये देखिल ही परिस्थिती अजुनच भयंकर आहे.
      आमची शाळा ही मुलींची आहेआणि मला असं वाटतं की घरातील स्त्री (मुलगी) जर सुस्कांरीत असेल  तर ती संपूर्ण कुटुंब व्यवस्था पर्यायाने समाजव्यवस्था सुरळीत व पर्यायाने आनंदीपणे चालवू शकेल. मग यासाठी आमच्या शाळेत विविधगुणदर्शन या वार्षिक उत्सवाचे स्वरुप बदलवून टाकले. आमच्या या उपक्रमाची प्रथमतः आम्ही उद्दिष्टे पुढीलप्रमाणे निश्चित केली.
१)      विद्यार्थ्यांच्यातील कलेचा शोध घेणे.
२)      तिच्या आवडत्या कलेचा परिपोष होईल त्या कलाप्रकारात तिचा सहभाग घेणे.
३)      योग्य ते बदल तिच्यात उपचारातून घडवून आणणे.
४)      तिच्यातील कलेचा आविष्कार करण्यास मदत करणे.

मग वरील उद्दिष्टानुरूप कार्यवाही सुरु केली.
१)      प्रथमतः आमचे सांस्कृतिक मंडळ आम्ही स्थापन केले. यामध्ये संगीत-नृत्य-नाट्य-नेपथ्य-निवेदन असे विभाग बनविले. विभाग बनवून झाल्यावर विभागाची सभा घेतली जाते.निरनिराळ्या पुस्तकांचे वाचन , सी.डी. बघणे , ऐकणे विविध व्याख्याने ऐकणे असा कार्यक्रम आमच्या विभागाचा सुरु होतो.
यासाठी एप्रिल-मे पासुन जुलै पर्यन्त आम्ही सतत एकमेकांशी चर्चा करतो.मुख्याध्यापक , अधिकारी हे देखील चर्चेत सहभागी होतात. आमच्या अनेक माजी विद्यार्थिनी की ज्या पूर्वी या मंडळात होत्या त्या देखील विविध विषय सूचवतात. मग सर्वजण मिळून जुलै दरम्यान विषय ठरवितो. त्याला अनुसरुन विषयाचे सूत्र ठरविले जाते.
उदा. कान्हा (कृष्णजीवनावरील नृत्य नाट्य संगीतमय आविष्कार) असा जर विषय घेतला तर यामध्ये गाणी कोणती असावीत, बाललीलेपासुन मोठ्या कृष्णापर्यन्त कसे कथानक घ्यावे, कोणत्या गाण्यांना नृत्य दाखविता येईल , कोणत्या संगीताच्या भागावर (मुझिक पिस ) नाट्य बसविता येईल हे ठरविले जाते. शिवाय यासाठी आवश्यक निवेदन जोडावे लागते,या सर्व गोष्टींचा विचार केला जातो. काही ठिकाणी तंत्रज्ञानाचा वापर देखील करावा लागतो. हे सर्व प्रथम ठरवले जाते.
२)      मग विषयानुरुप प्रथम संगीत विभागाचे शिक्षक संगीताची जाण असणारया विद्यार्थिनींची निवड करतात. मग त्यांच्यावर संगीताचे संस्कार केले जातात. त्यांच्याकडून ओंकार साधना . करवून घेतली जाते.या मुलींमधून वैयक्तिक गाणी म्हणू शकणारय विद्यार्थिनींची समूहात साथ देणे , गाणी म्हणणे या साठीच्या मुलींची निवड केली जाते. मग गाण्यांचे वाटप केले जाते.प्रत्येक गाणे त्या विद्यार्थिनीला खूप वेळा ऐकायला लावले जाते. त्याचा सराव घरी करण्यास आम्ही त्याची सी.डी. पण त्यांना करून देतो. चट् तासांना, संगीताच्या तासाला शाळा सुरू होण्यापूर्वी, सुटल्यावर या विद्यार्थिनींना दररोज अत्यंत निष्ठेने , आनंदाने गाण्यांचा सराव संगीत कक्षात करतात.
*आमच्या कार्यक्रमातील गाण्याची निवड ही विद्यार्थिनींच्या वयानुरुप संस्कारक्षम अशीच असते. कोणत्याही रेडीमेड रेकाँर्डस् चा वापर केला जात नाही. पेटी-तबला,साईड रिदम्, सिंथ, आँक्टोपँड् . चा प्रत्यक्ष (लाईव्ह) वापर केला जातो.*
) आमचा कार्यक्रम हा वी ते १० वी या वयोगटासाठी आहे. त्यामुळे याचे भान ठेऊन ,
त्यांच्या   बैठकीचा (स्टँमिना) बघून ते .३० तासाची कार्यक्रमाची आखणी केली जाते. १६ ते १७ गाण्यांचा समावेश असतो. यामध्ये वैयक्तिक गीते, समूह गीते , शास्त्रीय गीते, हिंदी गीते, मराठी गीते, संस्कृत गीते, कन्नड गीतांचा समावेश आम्ही करतो.
) नुसता गीतांचा कार्यक्रम या वयोगटासाठी कंटाळवाणा ठरेल म्हणून यातील गीतांच्या जोडीला नृत्याविष्कार केला जातो. शास्त्रीय नृत्य शिकणारया (कथ्थक्,भरतनाट्यम्) विद्यार्थिनी,पाश्चिमात्य नृत्य कणार् या ,अंगातच लय असणार् या आणि हौशी कलाकार सर्वांचे वेगवेगळे गट बनविले जातात.
त्याचप्रमाणे काही विद्यार्थिनींच्यात नाट्य अभिनयकला अत्यंत चांगली असते. अशा विद्यार्थिनी वेगळ्या केल्या जातात. त्याचप्रमाणे या सगळ्यांत महत्वाची गोष्ट ठरते ती व्यक्तिरेखेसाठी विशिष्ठ पात्रांचा शोध. कार्यक्रमाचा विषय ठरल्यावर त्यात एकूण किती व कोणकोणती पात्रे आपल्याला लागणार आहेत हे आम्ही ठरवितो. आणि मग कलामंडळ सदस्य (शिक्षक) सतत व्यक्तिरेखांच्या शोधात राहतात.
उदाहरणार्थ पाहूयाकृष्ण- अत्यंत लोभस-गोंड्स-देखणं-बोलके डोळे-खोडकरपणा असणारं लाडीक व्यक्तिमत्व अशी विद्यार्थिनी शोधली जाते. मग कार्यकमात लहानपणीचा कृष्ण,पेंद्याशी खेळतानाचा थोडा मोठा कृष्ण, राधेबरोबरचा कृष्ण अशा तीन व्यक्तिरेखा लागणार असतील तर साधारण दिसायला जवळपास साम्य असणार् या ५ वी ,७ वी, ९ वी अशा वयोगटातील विद्यार्थिनी शोधल्या जातात. भूमिका वाटप करून समजाऊन दिल्या जातात.
नंतर सप्टेंबर आँक्टोंबर मध्ये मुलींचे गट बनवून त्यांना कार्यक्रमातील गाणी वाटून दिली जातात. शास्रीय नृत्यासाठी आमच्या माजी विद्यार्थिनींची-पालकांची पण आम्ही मदत घेतो. शाळेत नृत्य-नाट्य विभागाची जबाबदारी माझ्यावर असते. शाळेच्या मुख्याध्यापिका व अधिकारी वर्ग आमच्या पाठीशी असल्याने आम्हाला तासांची जुळणी करून देतात. मग नृत्य-नाट्य-संगीत असा एकत्र सराव चालू होतो. जवळजवळ २ ते ३ महिने आम्ही या कार्यक्रमासाठी झटत असतो. प्रत्येक गाण्यावरचे नृत्य-नाट्य अत्यंत बारकाईने बसविले जाते. कोणताही भडकपणा-हालचालींमध्ये,हावभाव करताना किंवा पोषाख करताना येणार नाही याची प्रत्येकजण काळजी घेते.
३)      कार्यक्रमातील एकएक गाणे परिपूर्ण करून त्याबरोबर निवेदनासहीत सरावाला आता सुरूवात होते. कारण कार्यक्रमातील मुलीला हे माहीत असावे लागते, की कोणत्या निवेदनानंतर आपल्याला रंगमंचावर प्रवेश घ्यायचा आहे. शिवाय निवेदनाच्या तेवढ्याच वेळात त्यांना आवश्यक साधनसामुग्रीची व्यवस्था त्यांची त्यांची त्यांनाच करायची आहे, कारण एकदा कार्यक्रम सूरू झाला की आम्ही कोणीही शिक्षक स्टेजवर प्रवेश करत नाही. मग यामध्ये एकाच गाण्यात ९वी-१०वी-५वी च्या मुली एकत्र काम करत असतात अर्थातच मोठ्या ताई छोट्यांना सांभाळून प्रसंगी पोषाख-मेकअप बदलून प्रवेश करण्यास मदत करतात. निवेदन लिखाणाचे काम देखिल शाळेतील शिक्षकच करतात.
४)      शाळेतील चित्रकला शिक्षक व कार्यानुभव शिक्षक कार्यक्रमातील मुलीच्या मदतीने नेपथ्य बनवितात.कार्यक्रमात १०० ते १५० विद्यार्थिनींचा सहभाग असल्याने मेक अपपोषाख,
५)      शिवाय प्रत्येक गाणे-प्रसंगानुरूप पोषाख बदल असल्याने शाळेतील् प्रत्येक घटकाची आम्हांला मदत घ्यावी लागते. पालकांचे सहकार्य तर आमच्यासाठी अत्यंत महत्वाचे असते.
आणि या कार्यक्रमाच्या वेळी आमची स्थिती अशी असते
विश्वासाने एकत्वाच्या मार्गावर करीता चाल।
६)      इतक्या सगळ्या कलाकारांसाठी खुप मोठ्या व भक्कम स्टेजची आवश्यकता असते,ही गरज ओळखून संस्थेच्या पदाधिकार् यांनी आम्हाला अत्यंत भक्कम व प्रशस्त स्टेज बांधून दिले आहे.                               
७)      आता या सगळ्यामध्ये महत्वाचा भाग म्हणजे आम्ही नृत्य-नाट्य-संगीत-वक्तृत्व यामध्ये शिक्षण झालेल्याच तरबेज मुलीचिच् निवड करतो का? किंवा ज्यांचे पालक आवश्यक गोष्टी आर्थिक किंवा इतर कारणाने पुरवू शकत नाहीत त्यांना घेतो का?
तर आम्ही या कार्यक्रमामध्ये ज्यांना भाग घेण्याची इच्छा आहे त्या सर्व विद्यार्थिनींची निवड यामध्ये आम्ही करतो. कारण आमचा हा कार्यक्रम कोणताही प्रोफेशनल स्टेज शो नसतो.त्या तोडीचा आम्ही तो बसवतो पण आमचा मुख्य हेतु विद्यार्थिनींचा निखळ आनंद हाच असतो.
भले एखाद्या विद्यार्थिनीला अभिनय करायचा आहे पण मुळात त्यातील काही येत नाही,मग तिला मुख्य भूमिका दिली जात नाही पण तिला स्टेज वर येण्याची संधी दिली जाते. त्यामुळे शाळेतील सर्व मुलींना हा कार्यक्रम आपला वाटतो.त्यामुळे अनेक स्वयंसेवक आम्हाला मिळतात. शिवाय आर्थिक मदत ज्या मुलीना हवी असते त्या साठी आम्ही शिक्षक कल्याणनिधी गोळा करतो.

 गेले १० वर्षे आमची प्रशाला असे कार्यक्रम बसवत आहे व सादर करत आहे. त्यातील काही विषयांचा उहापोह खालील प्रमाणे
) किलबिलाटबालगीतांवर आधारित कार्यक्रम.
) ऋतुगंध भारतीय सण त्यांचे सामाजिक सांस्कृतिक वैज्ञानिक महत्व.
) वन्दे मातरम्। - देशभक्तीपर गीते-प्रसंग यावर आधारित कार्यक्रम.
)सा-रे---विविध बालगीते भक्तीगीते भावगीते यांवर आधारित कार्यक्रम.
) कान्हाकृष्णाच्या बाललीलांपासुन अनेक लीलांवर प्रकाश टाकणार उदबोधन पर कार्यक्रम.
) मोरयागणपति-गजानन बुद्धिची देवता तिच्या अनेक रूपांविषयी माहिती देणारा कर्यक्रम
) निसर्गायणपर्यावरण वाचवा आणि निसर्ग या विषयावर आधारीत कार्यक्रम.
) बोलावा विठ्ठलमहाराष्ट्राचे दैवत असणारा पांडुरंग. त्याच्या दर्शनासाठी आतुर वारकरी.वारी भक्तीने ओथंबलेला सोहळा.
) राजा शिवछत्रपति शिवछत्रपतिंच्या कार्याचा महान आदर्श विद्यार्थांपुढे ठेवण्यासाठी हा भव्य उत्सव.
१०) तेजोमय नादब्रह्म हे आमच्या प्रशालेचे अमृत महोत्सवी वर्ष होते.त्यामुळे आमच्या १० वर्षातील कार्यक्रमाचा आढावा आम्ही या कार्यक्रमात घेतला. शिवाय आमच्या माजी विद्यार्थिनींचा सहभाग देखील यात होता
अशा विविध विषयांवर मंत्रमुग्ध करणारे कार्यक्रम आमच्या प्रशालेने सादर केले आहेत. या कार्यक्रमांसाठी आम्हाला संस्थेचे सचिव, शिक्षणतज्ज्ञ कै. प्रभुणे सरांनी प्रेरणा दिली. शिक्षण मंडळ कराड या संस्थेचे सर्व पदाधिकारी नेहमीच आमच्या पाठीशी असतात. या कार्यक्रमाची मुहूर्तमेढ प्रशालेच्या अत्यंत सृजनशील मुख्याध्यापिका परांडकर बाईंनी रोवली. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे अनेक वेळा आमच्या या कार्यक्रमांना कराडचे आदरणीय माजी खासदार व सध्याचे सिक्किमचे राज्यपाल श्री. श्रीनिवास पाटील या कार्यक्रमांना उपस्थित असत, व प्रत्येकवेळी आम्हाला त्यांच्या कौतुकाची थाप मिळे.

आता या कार्यक्रमाचे शालेय जीवनातील महत्व व कार्यक्रमातून झालेली फलनिष्पत्ती पाहूया
१1)      अनेक विद्यार्थिनीना स्टेज मिळते.
२2)      विद्यार्थिनींमधील सुप्त गुण त्यांना समजतात. व शिक्षकांना विद्यार्थिनींमधील सुप्त गुण कळतात.
३3)      समूह नृत्य-गीत गायनामुळे कलेबद्दलची स्टेज बद्दलची भीड चेपते व सभाधीटपणा येतो.
४4)      समृद्ध वारशाची जाणीव विद्यार्थिनींना होते.
५5)      अंगविक्षेपभावना उद्दीपित करणारे प्रसंग-पोषाख-भडकपणा हे म्हणजेच करमणूक हे समीकरण बदलून क्लासिकल् बघण्याची ऐकण्याची सवय लागते.
६6)      भावनिक परिवर्तनाच्या काळात शारीरिक ,मानसिक उर्मीला योग्य काम मिळते. त्यामुळे वेळेचा सदुपयोग करण्यास मदत होते.
७7)      खुप पात्रांना परत परत स्टेजवर यावे लागत असते,पोषाख,रंगभूषा (मेक-उप)करावी लागत असते.यामुळे परस्पर मदत-संवादाची सवय होते. वेळेच्या नियोजनाची सवय लागते.
८8)      विषय निवड,विद्यर्थिनींची निवड निवेदन लिखाण यासाठी सांस्कृतिक मंडळातील शिक्षकांच्यात
विचारांची देवाण-घेवाण वाढते.
९9)      विद्यार्थिनी शिक्षक यांच्यातील अंतर कमी होते.
१10)  त्याचप्रमाणे जेव्हा आपल्याला कार्यक्रमासाठी वेळ द्यायचा आहे असे विद्यार्थिनींच्या लक्षात
येते तेव्हा अभ्यासासाठीचा वेळ अतिशय योग्य प्रकारे वापरतात.(क्वालिटी टाईम फाँर स्टडी)
१11  संगीत आणि नृत्य यामुळे एकाग्रता वाढते.
१12  गेल्या १० वर्षात आमच्या कार्यक्रमात सहभागी विद्यार्थिनींच्या गुणांचा रेशो काढला तर तो आम्हाला वाढलेलाच दिसला आहे.
असे अनेक फायदे आम्हाला या कार्यक्रमामधुन पहावयास मिळाले आहेत.आमच्या गावात  या कार्यक्रमांविषयी प्रतिवर्षी अत्यंत उत्सुकता वाढलेली आम्हांला दिसते. ही आमच्या साठी जणु शाबासकीच असते.
      दूरदर्शनच्या सर्व चँनेल्सवर, मोबाईलवर, इंटरनेटवर जे काही पहावयास विद्यार्थांना मिळते ते या पिढीसाठी अत्यंत घातक आहे. मी व माझे सुख मग ते कोणत्याही मार्गे मिळवा. असे दाखवले जातेय. नितीमत्तेचा विसर पडतोय. मग यामध्ये शिक्षक म्हणून आपली भूमिका महत्वाची ठरते. विभक्त कुटुंब पद्धतीमुळे संस्कारांची शिदोरी मुलांना आपणच दिली पाहीजे म्हणूनच या संस्कारक्षम कार्यक्रमाचा खटाटोप्.

सौ. माधुरी अभय कुलकर्णी